शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेचा सोयीस्करपणे वापर : निरंजन टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:40 IST

सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले.

ठळक मुद्देपरिवर्तनवादी समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात मत व्यक्त

सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी राज्यसरकार, सीबीआय यंत्रणा कशी वागत आहे? हे स्पष्ट करून न्यायव्यवस्था पोखरली जात असल्याचेही ते म्हणाले.

सातारा येथील परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सातारा पाठक भवनमध्ये ‘भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोेलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर होते. विचारमंचावर विजय मांडके, जयंत उथळे होते.न्यायव्यवस्था व सत्ताधारी यांच्या अभद्र व हितसंबंधी आता जनतेनेच बोलले पाहिजे. जनतेने गप्प राहू नये. बोलला नाहीतर जिवंत राहिला काय, किंवा मेला काय तुमचा काय उपयोग? लोकशाही व न्यायव्यवस्था रक्षणाची जबाबदारी जनतेइतकीच माध्यमांची आहे. माध्यमांनी सत्य बाहेर आणले पाहिजे.

सर्वोच्य न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची घुसपूस सांगितली. माझ्यासह देशातील बहुसंख्य जनतेने त्यांचे स्वागत केले. भारतीय लोकशाहीसाठी हे स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांची व सरन्यायाधीशांची बैठक झाल्यानंतर या न्यायाधीशांचे समाधान झाल्याने ते पुन्हा कामावर हजर झाले. त्या बैठकीत काय झाले? काय ठरले? हे जनतेला कळले पाहिजे, असेही निरंजन टकले यांनी सांगितले.यावेळी निरंजन टकले यांनी न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण, मालेगाव स्फोट प्रकरण, बर्ड फ्ल्यू प्रकरण, कोपर्डी प्रकरण यासंदर्भात सत्ताधारी व तपास यंत्रणा न्यायव्यवस्था यांच्या हस्तक्षेपाविषयी धक्कादायक माहिती सांगितली. भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेपुढे जर जनतेने लक्ष दिले नाही तर गंभीर आव्हान उभे राहू शकते, असेही ते म्हणाले. जयंत उठले यांनी प्रास्ताविक केले. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, अरुण गोडबोले, डॉ. प्रसन्न दाभोलकर, डॉ. सुहास पोळ, डॉ. राजश्री देशपांडे, कॉ. किरण माने, कॉ. वसंतराव नलावडे, कॉ. भगवानराव भोसले, राजेंद्र गलांडे, रणजित भोसले, मिनाज सैयद, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ आदी उपस्थित होते.सातारा येथे आयोजित व्याखानात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान झाले. यावेळी विजय मांडके, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, जयंत उथळे उपस्थित होते.